Monday 25 February, 2013

देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही -शरद जोशी

देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही -शरद जोशी


या देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आपण लढतच राहणार, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे केले. लातूर- ज्ञानश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्व. निवृत्तीराव मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा "ज्ञानाई पुरस्कार' शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना जाहीर झाला आहे. ए...क लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील मुकुंदराज सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्व. निवृत्तीराव मोरे आणि त्यांच्या पत्नी ज्ञानुबाई मोरे यांनी मराठवाड्यात शेतकरी संघटनेचे प्रभावी काम केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये न्याय्य हक्कांसाठी अभूतपूर्व क्रांती करणाऱ्या आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी लढा देत असलेल्या शरद जोशी यांची निवड करण्यात आल्याचे श्रीरंगराव मोरे यांनी सांगितले आहे.
Sunday, December 23, 2012 AT 12:30 AM (IST)

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे

·         स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे   निखारे                                                                

·                                                                                                                              -  शरद जोशी

·         लोकसत्ता (Published: Wednesday, February 6, 2013)

·                              शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे व समस्या समजून घेण्याचे ठरविले..

·        
                     शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले..

·        
                     माझ्या हातून एंगल्सच्या The origin of family, the private property and the State या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे एक पुस्तक लिहिले गेले आहे - The women's Question. त्याबरोबर चांदवडच्या प्रचंड महिला अधिवेशनाच्या तयारीसाठी महिलांना पूर्वतयारी म्हणून 'चांदवडची शिदोरी' ही पुस्तिकाही माझ्या हातून लिहिली गेली आहे, पण तरीही मी स्वत:ला महिला विषयातला जाणकार किंवा तज्ज्ञ मानत नाही.

·        
                     शेतकरी संघटना जशी माझ्या हातून होऊन गेलेला एक चमत्कार आहे त्याचप्रमाणे शेतकरी महिला आघाडी हा माझ्या हातून घडलेला त्याहूनही मोठा चमत्कार आहे. या चमत्काराची सुरुवात १९८२ साली जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेच्या सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात झाली. त्या अधिवेशनात त्या वेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने-लीलाने पहिले भाषण केले आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठय़ा परिणामकारकरीत्या मांडली होती. सौ. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. 

·        
                     त्यानंतर एक प्रसंग घडून आला. विदर्भात मी गेलो म्हणजे वर्धा येथील रवी काशीकर यांच्या घरी माझा मुक्काम असे. मी मुक्कामाला असलो की सहजच पाच-पंचवीस कार्यकर्ते मुक्कामाला आणि त्यासंबंधीच्या प्रचारयात्रेमध्ये असत. त्या वेळी स्वयंपाकघर सांभाळण्याचे काम सरोज वहिनींवर पडे. सकाळच्या नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांना कांदा-मिरचीची फोडणी घालून बनविलेला शिपोतू नावाचा एक पदार्थ सर्वाना खूप आवडे, त्याचे काही वेगळे काम पडत नसे. तरीही एके दिवशी सरोज वहिनींनी तक्रार केली की, बाहेरच्या दिवाणखान्यात तुम्ही पाच-पंचवीस कार्यकर्ते घेऊन बसता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करता, त्यात आमचा सहभाग कोठेच नाही. ही तक्रार लक्षात घेऊन घरमालक रवी काशीकर यांनी एक कल्पना काढली. एक दिवस सुट्टीचा समजून त्या दिवशी चूल बंद. त्या दिवशी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सर्वानी सहकुटुंब वनभोजनासाठी जायचे. त्या दिवशी जी चर्चा होईल ती प्रामुख्याने महिलांना रुची वाटेल अशाच प्रश्नांवर व्हावी. तेही घडून गेले. पुढे सरोज वहिनी या प्रभा राव यांचा पराभव करून विधानसभेत निवडून आल्या. एवढेच नव्हे तर अध्यक्षांच्या तालिकेतही त्यांचे मानाचे स्थान होते. आजपर्यंत अनेक वेळा मी त्यांच्यावर संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकांच्या समालोचनाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ती त्यांनी नेहमीच उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे. 

·        
                     चांदवडच्या अधिवेशनाच्या खूप आधी घडलेली आणखी एक घटना. सुरुवातीला अगदी तरुण कार्यकर्ते संघटनेत आले, यथावकाश त्यांची लग्ने होऊ लागली. अशाच एका कार्यकर्त्यांच्या पत्नीने मला एक पत्रवजा विनंती केली, 'माझे पती स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते संघटनेचे काम करतात. हे काम चांगले आहे. याचा मलाही अभिमान आहे. पण या कामात माझे नेमके स्थान कोणते हे मला अजून समजलेले नाही. दिवसांमागून दिवस हे घराबाहेर राहतात आणि घरी आल्यावर आपल्यासंबंधीच्या अनेक आठवणी सांगतात. आणि माझी स्थिती समोरून पंचपक्वान्नांचे ताट जाऊन स्वत: उपाशी राहणाऱ्या प्राण्यासारखी होते.' या विनंतीचा शेवट तिने मोठय़ा धमकीने केला होता. 'तुम्ही जर का या प्रश्नाला योग्य उत्तर शोधले नाही तर मी या जगात फार दिवस राहू शकणार नाही इतका माझ्या जिवाचा कोंडमारा होत आहे.' 

·        
                     शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे व समस्या समजून घेण्याचे ठरविले. मराठवाडय़ातील हळीहंडरगुळी येथील पहिल्याच बैठकीत अनेक प्रयत्न करूनही स्त्रियांना बोलते करण्याची कल्पना काही प्रत्यक्षात येईना. याच बैठकीत एक मधली सुट्टी घेऊन मी महिलांना भजन किंवा अभंग म्हणण्याची सूचना केली. त्यांनी ती चढाओढीने अमलात आणली. त्यानंतर महिला अहमहमिकेने चर्चेमध्ये भाग घेऊ लागल्या. ही परंपरा पुढे अनेक वर्षे टिकली. त्या वेळी माझ्यासोबत 'योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परुळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा याही होत्या. विजय परुळकरांनी, सुरुवातीला बुजून गप्प बसलेल्या महिलांचा चर्चेत भाग घेण्याचा उत्साह पाहून मला एक चिठ्ठी लिहिली. मी स्वत:ला (Communication Expert) समजतो, पण माझेही तुम्हाला वंदन आहे. ही चिठ्ठी अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत मी जपून ठेवली होती; आता ती कोठेतरी गहाळ झाली. त्यानंतर आणखी चार ठिकाणी शिबिरे झाली. स्त्रियांच्या प्रश्नांची मनात थोडी थोडी जुळणी होऊ लागली. स्त्री-प्रश्नावरील पुस्तकांचा आणि चळवळीचा अभ्यासही चालू होता.

·        
                     योगायोगाने त्याच वेळी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे माझ्याकडे आंबेठाणच्या शेतावर भेटण्यास आले. त्यांनी संगमनेरच्या त्यांच्या महाविद्यालयात मी भाषण देण्याकरिता यावे अशी विनंती केली. त्याबरोबरच त्यांनी, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताशी सुसंगत स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी मी करावी अशीही इच्छा व्यक्त केली. रावसाहेब कसबे हे स्वत: अनेक सामाजिक प्रश्नांवरचे जाणते समीक्षक आहेत. त्यांनी दिलेले हे निमंत्रण मी आव्हान म्हणूनच स्वीकारले. कारण, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताबद्दल मला इतका आत्मविश्वास होता की, त्याच्याशी सुसंगत अशी स्त्री-प्रश्नांची मांडणी करता येईल याची मला आतून खात्री वाटत होती. शिवाय, चार-पाच शिबिरांत स्त्रियांनी आपल्या मनातील खळबळ ऐकवून बांधून दिलेली शिदोरीही हाती होती.

·        
                     १९८६ च्या फेब्रुवारी महिन्यात एक केवळ शेतकरी महिलांचे अधिवेशन भरवावयाचे ठरले होते. माझ्या दुर्दैवाने त्याच सुमारास म्हणजे १९८५ च्या डिसेंबरमध्ये मला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलावे लागले. ती इष्टापत्तीही ठरली. त्यामुळे सगळा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पुन्हा सावचितपणे फिरून अधिक अभ्यास व अधिवेशनाचा प्रचार करण्याचे काम जमले. 

·        
                     या सर्व अभ्यासातून आणि आजारानंतरच्या विश्रांतीच्या काळातील चिंतनातून 'चांदवडची शिदोरी' या पुस्तिकेची निर्मिती झाली. 'चांदवडची शिदोरी'त दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. पहिला मुद्दा म्हणजे समाजवादी पद्धतीने मुलांसाठी पाळणाघर आणि सर्वासाठी सामायिक रसोडे घालून स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही. स्त्रियांचा प्रश्न हा शेतीतील वरकड उत्पन्नाच्या लुटीतून सुरू झालेल्या रक्तबंबाळ युगातील एक अवशेष आहे. दुसरा मुद्दा असा की, अमेरिकन स्त्रीवाद्यांचे म्हणणे असे आहे की, 'पुरुष हा अधिक बलवान असल्यामुळे तो स्त्रियांवर सत्ता गाजवतो.' तसे म्हटले तर, स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करू शकणाऱ्या पुरुषांची संख्या अत्यल्पच असते, पण अशा शक्यतेच्या भीतीने पुरुष स्त्रियांना घरात कोंडून ठेवत असावेत. पुढे माझा प्रतिवाद होता की, पुरुष हे अधिक बलवान नसून अधिक कमजोर आहेत. कारण, त्यांच्या जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा फारच मर्यादित आहेत. याउलट, स्त्रियांना भावी आयुष्यात त्यांनी बजावयाच्या अनेकविध भूमिकांकरिता निसर्गानेच त्यांना जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा अधिक व्यापक दिलेल्या आहेत. बलात्काराचा पुरुषांचा व्यवहारातील अनुभव तसा विरळाच. याउलट, शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले.

·         (लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.)

·         --------------------------------------------------------------------------------------------------------

·         चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न

·        

·         पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी

·         येथे

·         किंवा चित्रावर क्लिक करा.

·         ----------------------------------------------------------------------------------------


 

Saturday 23 February, 2013

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढतच राहणार-शरद जोशी


- (प्रतिनिधी)
Tuesday, December 25, 2012 AT 12:15 AM (IST)
Tags: sharad joshi,   farmer,   agrowon,   beed
शरद जोशी; मोरेवाडी येथे ज्ञानश्री पुरस्काराचे वितरण
अंबाजोगाई, जि. बीड- या देशातील शेतकरी कर्जमुक्‍त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आपण लढतच राहणार, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे केले.
तालुक्‍यातील मोरेवाडी येथील ज्ञानश्री प्रतिष्ठानतर्फे शरद जोशी यांना ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते "ज्ञानश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव, रघुनाथ पाटील, श्रीरंगराव मोरे, भास्करराव बोरावकर, माजी आमदार वामनराव चटप, पाशा पटेल, प्रा. शेषराव मोहिते हे या वेळी उपस्थित होते.
या वेळी जोशी म्हणाले, की संत ज्ञानेश्‍वर, मुकुंदराज स्वामी यांनी त्यांच्या काळात शेतकरी चळवळ निर्माण केली. वारकरी सांप्रदायातूनच आपणाला शेतकरी आंदोलनाची प्रेरणा मिळाली. शेतकरी संघटनेत अनेक कार्यकर्ते तयार झाले, त्यातले काही निघून गेले; परंतु तेही जोमाने काम चालवतात याचा आनंद आहे. माझ्याही काही चुका झाल्या असतील, तर त्या त्यांनी पोटात घालाव्यात आणि परत संघटनेत यावे. उसाच्या भावासंदर्भात झालेल्या आंदोलनापासून सर्व संघटना एकत्रित आल्या, ही नवी सुरवात आहे.
रा. रं. बोराडे म्हणाले, की शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या प्रश्‍नाची पेरणी शरद जोशी यांनी केली. अंगावर गोळी झाडली तरी ती झेलायची ही ताकद शेतकरी संघटनेने निर्माण केली. त्यांच्या व संघटनेच्या विचारांचा ग्रामीण साहित्यावर प्रभाव निर्माण झाला. अलीकडे शेतीच्या प्रश्‍नांची व्याप्ती वाढली आहे, त्यासाठी नव्या विचारांनी दिशा ठरवून पुढे जावे लागणार आहे.
प्रा. भास्कर चंदनशीव म्हणाले, की शेतकरी संघटना ही विचार पद्धती आहे, त्यातून शेतकऱ्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांतून प्रतिभाशाली विचार उभे राहिले आहेत.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, की शरद जोशींनी आम्हाला प्रश्‍नांच्या मुळाशी जायला शिकवले. आम्ही त्यांच्या शाळेत शिकलो याचा आनंद आहे. या वेळी प्रा. शेषराव मोहिते व ऍड. सच्चिदानंद मोरे यांनी ज्ञानश्री प्रतिष्ठानच्या पुरस्कारांमागील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन, ज्ञानेश्‍वरी व ग्रंथ पूजनाने झाला. सूत्रसंचालन प्रा. केशव देशपांडे यांनी केले. स्वागत रविकिरण मोरे यांनी केले. राहुल मोरे यांनी आभार मानले. 

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे

·                                                                                                   -  शरद जोशी

·         लोकसत्ता (Published: Wednesday, February 6, 2013)
·                              शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे समस्या समजून घेण्याचे ठरविले..
·        
                     
शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले..
·        
                     
माझ्या हातून एंगल्सच्या The origin of family, the private property and the State या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे एक पुस्तक लिहिले गेले आहे - The women's Question. त्याबरोबर चांदवडच्या प्रचंड महिला अधिवेशनाच्या तयारीसाठी महिलांना पूर्वतयारी म्हणून 'चांदवडची शिदोरी' ही पुस्तिकाही माझ्या हातून लिहिली गेली आहे, पण तरीही मी स्वत:ला महिला विषयातला जाणकार किंवा तज्ज्ञ मानत नाही.
·        
                     
शेतकरी संघटना जशी माझ्या हातून होऊन गेलेला एक चमत्कार आहे त्याचप्रमाणे शेतकरी महिला आघाडी हा माझ्या हातून घडलेला त्याहूनही मोठा चमत्कार आहे. या चमत्काराची सुरुवात १९८२ साली जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेच्या सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात झाली. त्या अधिवेशनात त्या वेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने-लीलाने पहिले भाषण केले आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठय़ा परिणामकारकरीत्या मांडली होती. सौ. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली
·        
                     
त्यानंतर एक प्रसंग घडून आला. विदर्भात मी गेलो म्हणजे वर्धा येथील रवी काशीकर यांच्या घरी माझा मुक्काम असे. मी मुक्कामाला असलो की सहजच पाच-पंचवीस कार्यकर्ते मुक्कामाला आणि त्यासंबंधीच्या प्रचारयात्रेमध्ये असत. त्या वेळी स्वयंपाकघर सांभाळण्याचे काम सरोज वहिनींवर पडे. सकाळच्या नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांना कांदा-मिरचीची फोडणी घालून बनविलेला शिपोतू नावाचा एक पदार्थ सर्वाना खूप आवडे, त्याचे काही वेगळे काम पडत नसे. तरीही एके दिवशी सरोज वहिनींनी तक्रार केली की, बाहेरच्या दिवाणखान्यात तुम्ही पाच-पंचवीस कार्यकर्ते घेऊन बसता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करता, त्यात आमचा सहभाग कोठेच नाही. ही तक्रार लक्षात घेऊन घरमालक रवी काशीकर यांनी एक कल्पना काढली. एक दिवस सुट्टीचा समजून त्या दिवशी चूल बंद. त्या दिवशी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सर्वानी सहकुटुंब वनभोजनासाठी जायचे. त्या दिवशी जी चर्चा होईल ती प्रामुख्याने महिलांना रुची वाटेल अशाच प्रश्नांवर व्हावी. तेही घडून गेले. पुढे सरोज वहिनी या प्रभा राव यांचा पराभव करून विधानसभेत निवडून आल्या. एवढेच नव्हे तर अध्यक्षांच्या तालिकेतही त्यांचे मानाचे स्थान होते. आजपर्यंत अनेक वेळा मी त्यांच्यावर संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकांच्या समालोचनाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ती त्यांनी नेहमीच उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे
·        
                     
चांदवडच्या अधिवेशनाच्या खूप आधी घडलेली आणखी एक घटना. सुरुवातीला अगदी तरुण कार्यकर्ते संघटनेत आले, यथावकाश त्यांची लग्ने होऊ लागली. अशाच एका कार्यकर्त्यांच्या पत्नीने मला एक पत्रवजा विनंती केली, 'माझे पती स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते संघटनेचे काम करतात. हे काम चांगले आहे. याचा मलाही अभिमान आहे. पण या कामात माझे नेमके स्थान कोणते हे मला अजून समजलेले नाही. दिवसांमागून दिवस हे घराबाहेर राहतात आणि घरी आल्यावर आपल्यासंबंधीच्या अनेक आठवणी सांगतात. आणि माझी स्थिती समोरून पंचपक्वान्नांचे ताट जाऊन स्वत: उपाशी राहणाऱ्या प्राण्यासारखी होते.' या विनंतीचा शेवट तिने मोठय़ा धमकीने केला होता. 'तुम्ही जर का या प्रश्नाला योग्य उत्तर शोधले नाही तर मी या जगात फार दिवस राहू शकणार नाही इतका माझ्या जिवाचा कोंडमारा होत आहे.' 
·        
                     
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे समस्या समजून घेण्याचे ठरविले. मराठवाडय़ातील हळीहंडरगुळी येथील पहिल्याच बैठकीत अनेक प्रयत्न करूनही स्त्रियांना बोलते करण्याची कल्पना काही प्रत्यक्षात येईना. याच बैठकीत एक मधली सुट्टी घेऊन मी महिलांना भजन किंवा अभंग म्हणण्याची सूचना केली. त्यांनी ती चढाओढीने अमलात आणली. त्यानंतर महिला अहमहमिकेने चर्चेमध्ये भाग घेऊ लागल्या. ही परंपरा पुढे अनेक वर्षे टिकली. त्या वेळी माझ्यासोबत 'योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परुळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा याही होत्या. विजय परुळकरांनी, सुरुवातीला बुजून गप्प बसलेल्या महिलांचा चर्चेत भाग घेण्याचा उत्साह पाहून मला एक चिठ्ठी लिहिली. मी स्वत:ला (Communication Expert) समजतो, पण माझेही तुम्हाला वंदन आहे. ही चिठ्ठी अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत मी जपून ठेवली होती; आता ती कोठेतरी गहाळ झाली. त्यानंतर आणखी चार ठिकाणी शिबिरे झाली. स्त्रियांच्या प्रश्नांची मनात थोडी थोडी जुळणी होऊ लागली. स्त्री-प्रश्नावरील पुस्तकांचा आणि चळवळीचा अभ्यासही चालू होता.
·        
                     
योगायोगाने त्याच वेळी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे माझ्याकडे आंबेठाणच्या शेतावर भेटण्यास आले. त्यांनी संगमनेरच्या त्यांच्या महाविद्यालयात मी भाषण देण्याकरिता यावे अशी विनंती केली. त्याबरोबरच त्यांनी, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताशी सुसंगत स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी मी करावी अशीही इच्छा व्यक्त केली. रावसाहेब कसबे हे स्वत: अनेक सामाजिक प्रश्नांवरचे जाणते समीक्षक आहेत. त्यांनी दिलेले हे निमंत्रण मी आव्हान म्हणूनच स्वीकारले. कारण, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताबद्दल मला इतका आत्मविश्वास होता की, त्याच्याशी सुसंगत अशी स्त्री-प्रश्नांची मांडणी करता येईल याची मला आतून खात्री वाटत होती. शिवाय, चार-पाच शिबिरांत स्त्रियांनी आपल्या मनातील खळबळ ऐकवून बांधून दिलेली शिदोरीही हाती होती.
·        
                     
१९८६ च्या फेब्रुवारी महिन्यात एक केवळ शेतकरी महिलांचे अधिवेशन भरवावयाचे ठरले होते. माझ्या दुर्दैवाने त्याच सुमारास म्हणजे १९८५ च्या डिसेंबरमध्ये मला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलावे लागले. ती इष्टापत्तीही ठरली. त्यामुळे सगळा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पुन्हा सावचितपणे फिरून अधिक अभ्यास अधिवेशनाचा प्रचार करण्याचे काम जमले
·        
                     
या सर्व अभ्यासातून आणि आजारानंतरच्या विश्रांतीच्या काळातील चिंतनातून 'चांदवडची शिदोरी' या पुस्तिकेची निर्मिती झाली. 'चांदवडची शिदोरी' दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. पहिला मुद्दा म्हणजे समाजवादी पद्धतीने मुलांसाठी पाळणाघर आणि सर्वासाठी सामायिक रसोडे घालून स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही. स्त्रियांचा प्रश्न हा शेतीतील वरकड उत्पन्नाच्या लुटीतून सुरू झालेल्या रक्तबंबाळ युगातील एक अवशेष आहे. दुसरा मुद्दा असा की, अमेरिकन स्त्रीवाद्यांचे म्हणणे असे आहे की, 'पुरुष हा अधिक बलवान असल्यामुळे तो स्त्रियांवर सत्ता गाजवतो.' तसे म्हटले तर, स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करू शकणाऱ्या पुरुषांची संख्या अत्यल्पच असते, पण अशा शक्यतेच्या भीतीने पुरुष स्त्रियांना घरात कोंडून ठेवत असावेत. पुढे माझा प्रतिवाद होता की, पुरुष हे अधिक बलवान नसून अधिक कमजोर आहेत. कारण, त्यांच्या जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा फारच मर्यादित आहेत. याउलट, स्त्रियांना भावी आयुष्यात त्यांनी बजावयाच्या अनेकविध भूमिकांकरिता निसर्गानेच त्यांना जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा अधिक व्यापक दिलेल्या आहेत. बलात्काराचा पुरुषांचा व्यवहारातील अनुभव तसा विरळाच. याउलट, शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले.
·         (लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.)
·         --------------------------------------------------------------------------------------------------------

·         चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न

·        
·         पीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी

·         येथे

·         किंवा चित्रावर क्लिक करा.
·         ----------------------------------------------------------------------------------------