Monday 29 April, 2013

चिनी मालावर बहिष्कार घाला - शरद जोशी

- -
रविवार, 28 एप्रिल 2013 - 12:45 AM IST

पुणे- ""चीनची घुसखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. जणू भारतीय लोक हातात हारतुरे घेऊन चीनचे स्वागत करीत आहेत, असे त्यांना वाटते. त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण चिनी मालावर सार्वजनिक बहिष्कार घालावा,'' असे आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी शनिवारी येथे केले. या संदर्भात लवकरच नवी मोहीम सुरू करण्यात येणा...र असल्याचेही ते म्हणाले.

सेतू ऍडव्हर्टाइजमेंटच्या वतीने आयोजित समारंभात शरद मुरलीधर देशपांडे यांच्या "शब्दार्थ' (एका "कॉपीरायटर'चा प्रवास) या पुस्तकाचे प्रकाशन जोशी आणि उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी जोशी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.

जोशी म्हणाले, ""चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे यायला हवे. त्यामुळे भारतात आपले स्वागत नव्हे; तर आपल्याला विरोधच होईल, हे चिनी लोकांना चांगले समजेल.''
""मोठे होण्यासाठी आयुष्यात केवळ पैसाच महत्त्वाचा असतो असे नाही. शब्दसंपत्तीच्या बळावरही मोठे होता येते. अशी शब्दसंपत्ती देशपांडे यांच्याकडे आहे. त्यांचे लेखन विनोदी, रसाळ, अर्थपूर्ण आहे. त्यांच्या लेखनावर पुल, अत्रे, गदिमा यांचा प्रभाव आहे. तरीही त्यांची स्वत:ची वेगळी शैली आहे. खरोखरीच "पुण्यभूषण' मिळावा, असे हे व्यक्तिमत्त्व आहे,'' असेही शरद जोशी यांनी सांगितले.

""प्राध्यापक म्हणून मी काही वर्षे नोकरी केली. पण गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडू शकलो नाही. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांचा नेता होण्यासाठी माझ्या अंगात एकही गुण नसताना मी शेतकऱ्यांचा नेता झालो. ज्या क्षेत्रात गुणवत्ता होती, तिथे यश का मिळाले नाही, याचा विचार मी नेहमी करतो.''
- शरद जोशी

No comments:

Post a Comment